विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करणार्या ’आम्ही भंडारी ग्रुप’तर्फे रविवार, दिनांक ३१-जुलै-२०११ रोजी पुण्यातील चतुश्रृंगी टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. गेली अनेक वर्षे चतुश्रृंगी टेकडीवर वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचं कार्य करणार्या ’ग्रीन हिल्स ग्रुप’ ह्या संस्थेतर्फे श्री. संजय सुर्यवंशी ह्यांनी ’आम्ही भंडारी ग्रुप’ला वृक्षारोपणाबाबत मार्गदर्शन केले. वृक्षारोपणात औदुंबर, आपटा, करंजे, कांचन, मोहगणी, पुत्रवंती, चिंच, विलायती चिंच, जांभुळ आणि शिसम इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली.
रिमझिम पावसाची बरसात,
टिकाव, फावडे, पहार, घमेले आणि खुरपे हातात.
पुर्ण केला 'संकल्प वृक्षारोपणाचा',
’आम्ही भंडारी’ने दणक्यात....!
टिकाव, फावडे, पहार, घमेले आणि खुरपे हातात.
पुर्ण केला 'संकल्प वृक्षारोपणाचा',
’आम्ही भंडारी’ने दणक्यात....!